निवडणुकीत सगळ्यात जास्त दारु आमदारांनी लोकांना पाजली, आता बंदीचा आव कशासाठी - बाजीराव दराडे यांचा घणाघात.!
अकोले तालुक्यात दारु बंदी विषय घेऊन आमदारांनी प्रशासनाची बैठक घेतली. दारु बंद करा, कारवाया करा, प्रस्ताव करा वैगरे भ्रामक संपल्पना मांडून केवळ मी कसा दारु विरोधी आहे, मला दारुड्या माणूस चालत नाही अशा प्रकारचा आव आणायचा. मात्र, निवडणुकीच्या काळात सगळ्यात जास्त दारु कोणी वाटली असेल तर ती आमदारांनी वाटली, तालुक्यात अनेक ठिकाणी बार आणि हॉटेल्स बुक होते. खुलेआम दारुची वाटप सुरू होती. आमदारांनी शपथ घेऊन सांगावे की मी एक थेंबभर सुद्धा दारु कोणाला पाजली नाही. ताकाला जायचे आणि गाडगे लापवायचे याला काही अर्थ नाही. लोकांनी पाहिले आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे त्यामुळे, २०१९ चा जनाधार आणि २०२४ ची निवडणूक यात फरक लक्षात येईल. कदाचित वैभव पिचड उभे राहिले नसते तर लहामटे आमदार झाले नसते असे असे दराडे म्हणाले. त्यामुळे, डॉ. लहामटे यांच्या आडमुठ्या धोरणावर बाजिराव दराडे यांनी घणाघात केला आहे.
राज्यात कोठेच इतके द्वेषाचे राजकारण होत नाही तितके अकोले तालुक्यात होताना दिसत आहे. विरोधात काम केले म्हणजे तुम्ही सरंजामी करार तोडला की काय? असा अविर्भाव दाखविला जात आहे. तोंडातून लोकशाही सांगायची आणि कर्मातून हिटलाशाही परावर्तीत करायची, अर्थात मुंह मे राम और बगल मे छुरी.! अशा पद्धतीचे राजकारण होताना दिसत आहे. कर्तुत्व तर शाबीत करायचे आणि मी त्यातला नाही अशा प्रकारचा आव आणायचा हे भुमिका बाजीराव दराडे यांना पटली नाही. त्यामुळे, त्यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या विरोध खळबळजनक विधाने केली. अर्थात त्यावर सोशल मीडियात सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. अकोले तालुक्यात लोकशाही आहे का? की त्यांना मतदान करणार्यांनाच लोकशाही आणि बाकीच्यांना हुकूमशाही? असे वातावरण तालुक्यात झाल्याचे दिसते आहे. वास्तवत: लोकप्रतिनिधींपुढे चाटूगिरी करणारे देखील जास्त झाले असून आमदार फक्त मुठभर लोकांसाठी बांधिल असेल्याचे दिसते आहे. त्यामुळे, लोकशाही सांगण्यार्या आमदारांनी संकुचित न राहता समन्वय राखून तालुक्याचा विकास केला पाहिजे असे काहीसे मत दराडे यांनी व्यक्त केले.
सती सावित्री होण्याचा प्रयत्न नको.!
खरंतर लोक भ्रष्टाचारावर बोलतात, दारु बंदीवर बोलतात, सत्य हरिश्चंद्राचा दाखला देतात, मग ते तसे वागतात का? तर मुळीच नाही. होय.! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, गणपतराव देशमुख ११ वेळा आमदार झाले. पण, बसने प्रवास करीत होते. दुर्दैवाने ज्यांना दान मागून निवडून दिले त्यांच्या घरापुढे पाच वर्षात कोटी रूपयांच्या अलिशान गाड्या, भलेभले कार्यक्रम, मोठमोठी बक्षिसे वाटप, निवडणुकीच्या काळात दारुचे गुत्ते व बार बुक, हॉटेलांसाठी चिठ्ठ्या, कार्यकर्त्यांना गाड्या, निवडणुका ह्या कार्यकर्ते सोडून ठेकेदारांच्या हातात, वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून नव्हे तर ठेकेदारांकडून भलेभले बॅनर्स हे कशाचे द्योतक आहे? मांजराने डोळे झाकून दुध पिले म्हणजे त्याला लोक पहात नाही हा त्याचा भ्रम असतो. त्यामुळे, कोणीच सती सावित्री होण्याचा आव आणू नये असे काहीसे मत दराडे यांनी व्यक्त केले.
हेरंब कुलकर्णी सरांंची भुमिका.!
खरंतर ज्या आमदारांचे गाव दारुमुक्त म्हणून प्रचलित झाले. त्याच हाद्दीत दारु, गांजा, हातभट्टी, आफुच्या गोळ्या यांची प्रचंड मोठी विक्री होते. अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गेली सहा वर्षे ते तेथे आमदार आहेत मात्र त्यांना स्थानिक दारुविक्री बंद करता आली नाही. उलट दारू पिवून लोक आमदारांनाच तोंडावर शिविगाळ करतात हे त्यांनीच अनुभवले आहे. एव्हाना आमदारांनी त्या व्यक्तीच्या उराडावर लाथ मारल्याने गुन्हा देखील दाखल आहे. अशात निवडणुक झाली तेव्हा पठार भाग, राजूर, मुळा, प्रवरा आढळा पट्टा पाण्यापेक्षा दारु आणि मटणाने जास्त बरबटला होता. त्यामुळे, तालुक्यातील असे एक दुकान दाखवा जे कारवाई करुन बंद झाले आहे. त्यामुळे, हेरंब कुलकर्णी यांनी लोकसहभागाच्या जोरावर आंदोलने केली तर त्याचा योग्य निकाल हाती येईल. अन्यथा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणजे तु मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. कार्यक्रम आला की मदत करतो... अशा प्रकारची भुमिका असते. त्यामुळे, हेरंब कुलकर्णी सर यांचे काम चांगले आहे. त्यांनी विनय सावंत साहेब यांच्यासारखे राजकीय वयल स्वत:च्या भोवती लावून घेऊ नये असे अनेकांना वाटते.
अमित भांगरे गायब झाले.!
निवडणुक झाली आणि अवघ्या पाच हजार मतांनी अमित भांगरे यांचा पराभव झाला. म्हणजे तुतारी व ट्रम्पेट यांच्यातील संदिग्धता लक्षात घेता अवघ्या दोन अडिच हजार मतांनी डॉ. लहामटे विजयी झाले. त्यात वैभव पिचड, मारुती मेंगाळ व मधुकर तळपाडे यांची संदिग्ध उमेदवारी लक्षात घेतली तर जनतेने अमित भांगरे यांना कौल दिला आहे. पण, निवडणुक झाली आणि त्यांनी महिना पंधरा दिवसानंतर अकोल्याकडे पाठ फिरवली. कदाचित त्यांची काहीतरी कौटुबिक समस्या चालु आहे. त्यामुळे, सुनिता ताई भांगरे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण, तरी देखील ज्या पद्धतीने विरोधी कार्यकर्त्यांना दमबाजी करणे, ठेकेदारांना गटात सामिल करुन घेणे, विरोधात काम करणार्यांची विविध ठिकाणी अडवणूक करणे यासाठी खंबिर नेतृत्व म्हणून लोकांना अमित भांगरे यांच्याकडून अपेक्षा आहे. ती पुर्ण होताना दिसत नाही असे काहीसे मत दराडे यांच्याकडून व्यक्त होताना दिसले.