धर्म असे काही शिकवत नाही.!
तरुणांनी समाजभान ठेवावे.!
एकीकडे लव जिहादला विरोध म्हणून संगमनेरात भगवे वादळ रौद्र रुप धारण करीत होते. हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये म्हणून मौलवी आणि पुजारी सलोखा टिकविण्याचा प्रयत्न करीत होते, प्रशासन दोघांच्या मध्यस्तीने सामोपचाराचा मार्ग काढत होते आणि अशा वेळी कोतुळमध्ये एक मुस्लिम तरुण घरात मुलीवर अत्याचार करीत होते. तर, एकीकडे हजारो-लोखांचा मोर्चा भर उन्हात रस्त्यावर उतरला होता आणि त्याच वेळी अगस्ति ऋषींच्या आश्रमात शेख नावाचा तरुण अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करीत होता. त्यामुळे, या तरुणांना समाजभान आहे का? आपण कोणते कृत्य कधी करतो आणि कोठे करतो आहे. आपल्या कृत्याचा आपल्या समाजावर काय विपरीत परिणाम होईल हे समजण्याची अक्कल त्यांना नसावी हे मात्र दुर्दैव आहे. त्या मुर्ख व्यक्तींमुळे समाजात चांगली लोक आहेत जे प्रतिष्ठीत आणि धर्मनिर्पेक्ष आहेत अशा लोकांना अक्षरश: खाली पहाण्याची वेळ येते आणि जणू आपणच गुन्हेगार आहोत की काय अशी मानसिकता होते. त्यामुळे, मुलांनी कोणतेही कृत्य करताना समाजभान ठेवले पाहिजे.
धर्म असे काही शिकवत नाही.!
गेल्या काही दिवसांपासून लव जिहाद या शब्दाने काहुर माजविला आहे. त्यामुळे हिंदु-मुस्लिम समाजात प्रचंड तेढ निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. पण, खरोखर जी काही प्रकरणे घडत आहेत त्यास लव जिहाद म्हणावे का? याची देखील शहनिशा करणे आवश्यक आहे. पण हिंदुत्वाच्या नावाखाली अगदी शालेय मुले, कॉलेजचे तरुण हाती दगड घेऊन स्वत:चे करिअर बरबाद करताना दिसत आहेत हे चित्र त्याहून अधिक विदारक आहे. ज्यांची आयुष्य सरले संसार उभे राहिले त्यांना राजकीय भविष्याचे पडले आहे. पण, तरुणांनी याचे बळी न पडता शिक्षण, नोकरी आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. कारण, कालच्या दंगलीत जे कोणी सीसीटीव्हीत दिसले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत असून आज या मुलांना दडून बसण्याची वेळ आली आहे. कोणताही धर्म सांगत नाही दंगली करा, पेटवा, तोडा, फोडा, दगडी फेका. पण, संधीसाधू राजकारणी मात्र जाती धर्माच्या नावाखाली तरुणांचा वापर करुन घेत आहेत. त्यामुळे, धर्माचे वाचन करा आणि शंभर टक्के त्याचे अनुकरण करा. कारण, धर्म जगायला शिकवतो, गुन्हेगार व्हायला मुळीच नाही.!