अकोल्याच्या सावकाराचा कर्जदाराने केला खून! तगादा लावल्याने वैताग, सावकारास शेतात गाडले.! पोलिसांची दक्षता, दोघे ताब्यात.!
सार्वभौम (अकोले) :-
सावकरी आणि कांद्याच्या पैशाच्या कारणातून अकोले तालुक्यातील अंकुश राऊ लामखडे (वय ५५, रा. केळवाडी, ता. संगमनेर) यांची दोघा तरुणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास जाचकवाडी शिवारात घडली. यात अशोक फापाळे व भाऊसाहेब उर्फ बारकू महाले (वय ३५. रा. जाचकवाडी, ता. अकोले) या दोघांना घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित दोघांनी लामखडे यांच्या डोक्यात खोरे मारुन त्यांना ठार केले. तर, एका टोमॅटोच्या शेतात नेवून पुरले होते. दोघे व्यक्ती कांदे घेऊन ते विकण्याचा व्यावसाय करतात. कांदे खरेदीसाठी यांनी व्याजाने रक्कम घेतली होती. संबंधित व्याजासह रक्कम वाढत गेली आणि लहामखडे यांच्या तगाद्यामुळे दोघांनी त्यांची हत्या केल्याची बाब समोर येऊ लागली आहे. ही घटना आज दि. ३० नोव्हेंबर रोजी उघड झाली असून याप्रकरणी रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी भाऊसाहेब महाले अकोले तालुक्यातील असून त्याची अंकुश लामखडे यांच्याशी ओळख झाली होती. भाऊसाहेब तथा बारकु याने जाचकवाडी शिवारात काही ठिकाणी शेती देखील वाट्याने केली होती. तर हा अनेक शेतकर्यांचे कांदे विकत घेऊन तो माल तेथेच ठेऊन शेतकर्यांना कांद्याची रक्कम देत असे. तर, काही दिवसानंतर हे कांदे उचलुन तो दुसर्या व्यापार्यांना देत असे. त्यासाठी याला काही पैसे गुंतवावे लागत होते. त्यामुळे, त्याने काही रक्कम ही लहामखडे यांच्याकडून व्याजाने घेतली होती. तर, त्यासाठी बारकुने त्याचेच जवळचे नातेवाईक मध्यस्ती घातले होते. मात्र, दरम्यानच्या काळात कांद्याला बाजार सापडले नाही. किंवा त्याच्याकडे पैसे आले नाही. त्यामुळे, तो पैसे अदा करु शकला नाही.
दरम्यान, जी काही मुद्दल होती. ती सोडून व्याजाची रक्कम वाढत चालली होती. त्यामुळे, लहामखडे यांनी बारकुकडे वारंवार तगादा लावला होता. आज नाही उद्या देतो असे करुन दिलेले वायदे टळत होते. त्यामुळे, लहामखडे यांनी मागणीचा जोर वाढविला होता. तर दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ही दोघे जाचकवाडी शिवारात एकमेकांना भेटले होते. तेथे त्यांच्यात पैशाहून वाद झाल्याची माहिती मिळत. मात्र, हा वाद टोकाला गेल्यामुळे बारकु व त्याचा साथिदार फापाळे यांनी टोकाची भुमिका घेतली आणि थेट अंकुश लहामखडे यांची दोघांनी हत्या केली असे समोर येऊ लागले आहे.
दरम्यान, रात्र झाली तरी लहामखडे हे घरी आले नाही त्यामुळे, त्यांचा कुटुंबातील लोकांनी शोध घेतला. मात्र, तरी देखील ते मिळाले नाही. म्हणून यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि अंकुश लहामखडे यांची मिसिंग दाखल केली. वयस्कर माणूस आहे. त्यामुळे, सकाळी ते घरी येतील अशा प्रकारची धारणा सगळ्यांनी केली. मात्र, दुसर्या दिवशी सकाळी काही व्यक्तींनी एक गाडी आणि चपला ह्या शेताच्या कडेला पडलेल्या दिसून आल्या. तेथील घटनास्थळी दिसणारी माहिती ही जरा संशयास्पद असल्यामुळे काही व्यक्तींनी थेट पोलिसांशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आणि सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटना ही अकोले हाद्दीत असल्यामुळे घुगे यांची तत्काळ तपासाला गती दिली. काही काळानंतर ज्या काही शंका होत्या. त्याचा गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. तर, काही सबळ पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी एक संशयीत म्हणून पहिल्यांदा भाऊसाहेब उर्फ बारकु महाले व अशोक फापाळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर घटनाचा उलगडा असा झाला. की, मयत व्यक्तीच्या डोक्यात खोरं मारुन त्यास पीक असलेल्या एका शेतात पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आता मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करून आरोपीस अटक करुन पोलीस कोठडी घेणे आणि कशा पद्धतीने हत्या केली. हे जाणून घेण्यात येणार आहे.