अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीचे आज काय झाले.! कधी होणार निर्णय.? पिचडांना मिळाल्याने सावंत साहेबांच्या 50 वर्षे एकनिष्ट असणारे शिष्य त्यांच्या विरोधात.!



- शांताराम गजे

     सार्वभौम (अकोले) :- 
                          काय ती अगस्तिची निवडणूक! काय ती भाषा !! काय त्या पत्रकार परिषदा !!!, काय ते पत्रकार ....एकदम ‘ओके’ वाचकहो निवडणूक रद्द झाली आणि आता तरी काही दिवस हे थांबेल , पण कसले काय ! शिमग्याच्या शिव्या चालूच राहिल्या थेट हाणामारीच्या भाषेपर्यंत. काळ वेळ बघेनात, वय वर्ष मानिनात बस्स ! पत्रकार परिषदाच परिषदा . एकाने एक शिवी दिली कि दुसऱ्याने लगेच कॅमेऱ्यावर दोन शिव्या द्यायच्या आणि काय ते थोर vedio journalist ! फक्त कॅमेरा फिरवणे इतकेच त्यांचे काम ! खुशाल काहीही बोला. त्यात बातमी असू नसू लगेच live .त्यात त्यांनी पत्रकारितेचा मुडदा पाडला. नको असली पत्रकारिता आणि त्याचे पोशिंदे ....
या रणधुमाळीत माझे सदर बंद होते. कारण काय विश्लेषण करावयाचे ? सुचेना. या निवडणुकीत दोन पँनल. त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तरी काय ? समजेना एकीकडे शेतकऱ्यांची काळजी वाढत होती त्यात परिवर्तनवाल्यांनी ऐनवळी हाराकिरी केली. माघार घेतली आणि निवडणुकीतील मुद्द्येबाजी संपली. निवडणूक केवळ व्यक्तिगत पातळीवर आली . कारखान्याच्या अर्थशास्त्राचा मुद्दा बाजूला गेला. परिवर्तनवाले गेली दोन वर्ष जे मुद्दे मांडत होते त्यांना त्यांनीच मूठमाती दिली तेच मुद्दे उगळण्यासाठी त्यांनी थेट  निवडलेले व्यासपीठ पूर्णार्थाने विसंगत होते.त्यामुळे त्या व्यासपीठावरून ते उगळत असलेले कर्जबाजारीपणाच्या मुद्द्यांकडे सभासद दुर्लक्ष करते झाले. एखाद्या संस्थेचा प्रदीर्घ काळ राहिलेले अध्यक्ष निर्दोष पण उपाध्यक्ष दोषी  हे तर्कशास्र लोकांना पटेना. मात्र या बाबत पत्रकार परिषदा मागून परिषदा घेणारे परिवर्तन वाले जास्त अप्रिय व विसंगत होत गेले. शेवटी अजित पवार यांच्या सभेने अंतिम ठोका मारून समृधीवाल्याचे पारडे जड केले असे दिसून आले.
उद्या (२५ जुलै) उच्च न्यायालयात तारीख आहे. सरकारने निवडणुका रद्द केल्या आहेत साखरकारखान्याच्या निवडणुका आता झाल्या नाहीत व पुढील संचालक मंडळ लगेच आले नाही तर जवळ जवळ तो यंदाचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय ठरेल. मागील संचालक मंडळ नवे येईपर्यंत काम पाहते,  हे केवळ कागदपत्रावरच खरे आहे. प्रत्यक्षात प्रत्येक पारधी त्याच्या काव्यात असणार ! अनंत कामे करावयाची आहेत. उस तोडणाऱ्या मजुरांपासून ,मशिनरी पासून , कर्ज उपलब्धी पर्यंत, त्यानंतर संचालकांच्या पर्सनल बॉंड पर्यंत ..... शेकडो प्रिसीझनल कामे ठप्प होतील.  व कारखान्याची चाके फिरणार नाहीत. इतके सारे  अनर्थ शासनाच्या दोन ओळीच्या जी. आर. ने होतील उद्या न्यायालय काय निर्णय देते  इकडे आठ हजार सभासद नजर लावून बसले आहेत.
येथे एक गम्मत दिसली. निर्णयाला आव्हान निवडणुकीतील समृद्धी पँनलच्या उमेदवारांनी दिले आहे. २८ वर्ष अध्यक्ष राहिलेले विकास पँनलचे äसुप्रीमो मात्र निष्क्रीय राहिले. ना ते कोर्टात गले ना त्याचे उमेदवार घेऊन त्यांच्या म्हणजे बी जे पी  शासनाकडे गले . कारण प्रचारात आमचेच सरकार असल्याचा त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता मा. फडणवीस किंवा मा शहा काय अगस्ति चालू करायला येणार होते काय? विकासवाल्यांची निष्क्रियता सभासदांना खटकलेली दिसली. इतकेच काम पण रविवारी (२४ जुलै) रोजी झालेल्या  विद्यमान संचालकांचे सभेत कर्ज उभारणी बाबत अध्यक्ष शब्दही बोलले नाहीत असे समजते. बहुदा त्यांनी सारा भरोसा केंद्र- राज्य सरकार किंवा एम एस सी बँकेवर ठेवलेला असावा! मात्र प्रत्यक्षात अगस्ति कारखाना एडीसीसी बँकेकडून कर्ज पुरवठा घेऊन चालतो. म्हणजे कुण्याच्या तरी डोक्यात पुन्हा कर्ज उभारणीचे क्रेडीट घ्यायचा एकमेव मुद्दा दिसतो. यानंतर अगस्तीत मोठ्या प्रमाणावर कुरघोडीचे राजकारण चालेल असे यावरून वाटते.  अगोदरच अगस्तीचा जीव तोळामासा झालेला आहे. अंतर्गत कुरबुरी अगस्तीला मानवणार आहेत काय ? कानोसा घेतला असता मतदार सभासदांनी काहीतरी निर्णय घेतलेला आहे. 
      श्री अजित पवार यांची सभा काहीतरी सांगून गेली आहे. सत्तावीस वर्ष अगस्ति सह तालुक्याची सत्ता होती. मात्र आज ज्या पायरीवर हा कारखाना नेऊन ठेवला आहे त्या बद्दल अगस्तीचे  उस उत्पादक दु:खी आहेत. ते  शेजारच्या संगमनेर शी तुलना करतात. व आणखी निराश होतात. त्यामुळे कारखाना कोण चालू करील, चालू ठेवील, कोण कर्ज उभारील अशाच  मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार फिरत राहिला  अगस्तीला कोण उंचीवर नेऊन ठेवील ? निदान संगमनेर इतका तरी भाव देईल ! संगमनेर, माळेगाव, पंचगंगा सारख्या  सुसंपन्न करू अशा गुणवत्ता प्रधान प्रचाराचा  मागमूसही ऐकू आला नाही. म्हणजे परीक्षेला बसून जेमतेम एटी केटी  ने पास व्हायचे. प्रथम वर्गामध्ये पास व्हायचे स्वप्नच नसावे काय ? असो अगस्ति समृद्धीमय व्हावा ही उत्पादकांची अपेक्षा आहे  ते बरेच कोर्टाच्या निणर्यावर अवलंबून आहे.

 उद्या चित्र स्पष्ट होईल.!

दरम्यान, समृद्धी मंडळाने औरंगाबाद खंडपिठात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आज दि. 25 जुलै 2022 रोजी सुनावणी होणार होती. स्पेशल बेन्च हा निर्णय देणार होते. मात्र, ते रेग्युलर कार्टाकडे वर्ग झाले. आज, वकीलांनी याबाबत आपले म्हणणे सागर केले असता न्यायालयाने यावर अद्याप काही निर्णय दिला नाही. ही निवडणुक होणे हे अत्यंत गरजेचे आहे. अवघा एक दिवसाचा प्रश्न आहे. तयारी देखील झाली आहे. त्यामुळे अगस्ति कारखान्याबाबत आपण विचार करावा अशी विनंती समृद्धी मंडळाच्या वकीलांनी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर, कोर्टाने अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. परंतु, यावर उद्या दि. 26 जुलै रोजी न्यायालय निकाल देण्याची शक्यता वकीलांनी दर्शविली आहे. उद्या आणखी काही कायदेशिर बाबी करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सुनावणीसाठी सिताराम पाटील गायकर हे औंरंगाबाद येथे असून तत्काळ हा प्रश्न मार्गी कसा लागेल यासाठी ते प्रयत्न करीत आहे.