उद्यापासून तीन दिवस संगमनेर पुर्णपणे लॉकडाऊन.! 188 कलमान्वये गुन्हे, तर रस्त्यावर दिसेल ते वाहन जप्त होणार!
संगमनेर (प्रतिनिधी):-
संगमनेरमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नसतांना प्रशासनाने अगदी कसोेशीने प्रयत्न करुन येथील नागरिकांचे संरक्षण केले. मात्र, आज संगमनेरमध्ये दोन रूग्ण आढळल्याचे समजताच प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी अगदी कठोर निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसात संगमनेर पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असून जो कोणी बाहेर निघेल त्याच्यावर 188 प्रमाणे कारवाई करुन त्यास शिक्षा होईपर्यत पाठपुरावा करणार असल्याची भुमिका प्रशासनाने घेतली आहे. इतकेच काय! जो व्यक्ती वाहन घेऊन विनाकरण रस्त्यावर दिसेल. त्याचे वाहन जप्त करुन ते कायदेशीर रित्या जोवर परिस्थिती पुर्वपदावर येत नाही. तोवर वाहन मिळणार नाही. त्यामुळे, येत्या तीन दिवस कोणीही घराबाहेर निघू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संगमनेरात कालपर्यंत सर्व नागरिक सुरक्षित होते. आता मात्र, येथील प्रत्येक नागरिकास सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. कारण जागतील हा संसर्ग तुमच्या दारात येऊन उभा आहे. त्यामुळे, या संसर्गाशी वेळीच दोन हात करणे गरजेचे आहे. खरंतर संगमनेर हा तालुका पुणे व नाशिक यांच्या मध्यभागी आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे सावट आहे. तर नगर जिल्ह्यातील आकडा 14 वर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे तालुक्यात दोन रुग्णांना लागण झाली असून त्याचा संसर्ग अधिक व्हायला नको. म्हणून प्रशासन आता सज्ज झाले आहे.ज्या प्रांताधिकार्यांनी त्यांच्या मातोश्रींचा दुखवटा पाळला नाही. त्यांच्या या भावनिक व कर्तव्यनिष्ठ आवाहनाला संगमनेर तालुक्याने समजून घेणे गरजेचे आहे. आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे. तो जनतेच्या हिताचा असून त्याचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करणे गरजेचे आहे. असे झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. अन्यथा येणार्या काळात संगमनेरात हे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतील. त्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना हात जोडून विनंती केली आहे. की, किमान तीन दिवस तरी घरी बसावे. अन्यथा प्रेमाची भाषा कळत नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जनतेच्या माहितीसाठी व देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने यात पुढाकार घेऊन फक्त घरी बसण्याचे सहकार्य प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. ज्यांना मेडिकल औषधे हवी आहेत. त्यांना घरपोच सुविधा मिळणार आहे. शक्यतो प्रत्येकाने आपले मानसिक मनोबल वाढवावे. म्हणजे आरोग्य आणि आजारपण येणार नाही. त्यासाठी किमान तीन दिवस तरी योगा करुन चांगला आहार घ्यावा. फारच गरज भासली तर हॉस्पिटलशी संपर्क करुनच बाहेर पडावे. यासाठी प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळ, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, तहसिलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षण पप्पू कादरी, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. कचेरीया यांच्यासह नगरपंचायत व सर्व कर्मचारी यांची मोलाची भूमिका असणार आहे. त्यांना सर्वांना सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
02425 225353 तहसिल कार्यालय
02425 225308 नगर पालिका
02425 221265 ग्रामीण रुग्णालय
सागर शिंदे
सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)