नेपाळच्या 14 तबलगींचा संगमनेरात बेकायदा अश्रय.! पाच जणांवर गुन्हा दाखल,

संगमनेर (प्रतिनिधी) :
दिल्लीत तबलगी समाजाच्या लोकांमुळे राज्यात व देशात कोरोना विषाणुने आहाकार माजविल्याचा आरोप होत आहे. असे असताना संगमनेर सारख्या ठिकाणी नेपाळ व अन्य राज्यातून आलेल्या 14 तबलगींना बेकायदेशी अश्रय दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात शहरातील पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हाजी जलीमखान कासमखान पठाण, हाजी शेख जियाउद्दीम आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दीन मोमीन, शेख रिजवान गुलाबमनी मोमीन (रा. मोमीनपुरा) अशी आश्रय देणार्यांची नावे आहेत. तर जे 14 परदेशी आलेले आहेत. त्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या सर्वांची वैद्याकीय चाचणी करण्यात आली असून त्यांच्यात संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही. त्यामुळे, कोणीही अफवा पसरवूू नये. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या पाच जणांवर साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यावस्थपन कायदा, 188,269 व 271 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेले राज्य म्हणजे महाराष्ट्र ठरले आहे. त्यात काही तालुक्याचा विचार करता संगमनेर हे देखील चर्चेचा विषय ठरले आहे. या तालुक्यात अगदी एकही रूग्ण नसताना अचानक चार कोरोना बाधित व्यक्ती आढळल्याने मोठी खळबळ उडाली. हा प्रकार इथेच थांबला नाही. तर, शहरातील मोमीनपुरा येथे नेपाळच्या 14 तबलगींना अश्रय देण्यात आला. खरंतर हा प्रकार 26 मार्च रोजी उघड झाला होता. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी इतका वेळ का लागला? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. जर कादाचित संगमनेरला कोरोनाने घेरले नसते. तर, हे परदेशी मेहमान मोमीनपुर्यात तळ ठोकून बसले असते. या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली की, संगमनेर शहर म्हणजे वाटते तितकी सुरक्षित सिटी नसून आओ जावो घर तुम्हारा असे येथे चालते. येथील प्रशासनाला वेळ निघून गेल्यानंतर जाग येते की काय? असे देखील प्रश्न उपस्थित होतो.
तुम्हाला कल्पना असेल की, जो कार्यक्राम दिल्लीच्या निझामुद्दीनमध्ये पार पडला. त्याचे नियोजन मुंबईतील वसईत करण्यात आले होते. मात्र, स्थानिक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यास मान्यता मिळाली नाही आणि त्यानंतर हा कार्यक्रम दिल्लीत झाला. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की, या कार्यक्रमामुळे दिल्ली आणि महाराष्ट्रात तब्बल 300 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही वेळ निघून गेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहे. आता हे महाशय त्यांचे कर्म करून फरार झाले आहेत. त्यामुळे, एक सजग नागरिक म्हणून आपण असे समाजविघातक कृत्य करणे अयोग्य आहे. तर कोणी बेकायदेशी काम करीत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणे प्रशासनाचे काम आहे. मात्र, दुर्दैवाने दोन्ही गोष्टी होताना दिसत नाहीत.
नेपाळहून आलेल्या 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असून त्यांच्यापासून कोणत्याही संसर्गाची भिती नाही. जर गरज भासली तर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. सद्या या सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली.