संगमनेरच्या 15 जणांसह जामखेडचे 31 जण ताब्यात, दोन पोलिस अधिकार्‍यांचा सामावेश.! 51 मश्चिदींना टाळे, तिघांवर गुन्हा.!


अहमदनगर (प्रतिनिधी):- 
                                   मुस्लिम धर्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणार्‍या 14 जणांनी जामखेडमध्ये जमात भरविली होती. ही माहिती पोलिसांना समजली असता त्यांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यातील दोघे कोरोना बाधित निघाले असून तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. अन्य नऊ जणांची माहिती येणे बाकी असून त्यांच्या सानिध्यात आलेल्या 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही टिम नगर शहरातील मुकुंदनगर येथे असतांना संमगनेरच्या 15 जणांशी त्यांचा संपर्क झाला होता. त्यामुळे, त्या सर्वांना संगमनेर प्रशासनाने ताब्यात घेऊन जिल्हा रग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. दरम्यान या सर्व प्रक्रियेत दोन पोलीस अधिकारी त्यांच्या सपर्कत आल्यामुळे त्यांची देखील कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे. काही बेजबाबदार नागरिकांमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे बोलेले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी आशिया खंडातील आयवरी कोष्टी, इरान व टांझानिया येथील 10 अभ्यासू व्यक्ती व त्यांच्यासोबत मुंबई आणि दिल्लीचे चार असे 14 जण नगरमधील मुकुंदनगर येथे दाखल झाले होते. याचे काम म्हणजे धर्माचा विस्तार करणे, लोकांना व्यसनापासून मुक्त करणे, नमाज विषयी माहिती सागणे अशी सामाजिक व धार्मिक कामे ते करत असतात. त्यास जमात म्हणून संबोधले जाते. हे नगरमध्ये आले असता त्यांना काही व्यक्तींने आसरा दिला होता. त्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल असल्याचे बोलले जाते. त्यानंतर या लोकांनी थेट जामखेड गाठले. तेथे चौंडी, खर्डा व जवळा अशा अनेक भागात त्यांचा काम सुरू ठेवले होते.
दरम्यान ते नगरमध्ये असतांना संगमनेरच्या 15 जणांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या संपर्कात राहून काही कामे केली होती. मात्र, याबाबत कोणालाही याची खबर नव्हती. जेव्हा जामखेडमध्ये या 14 जणांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्यातील दोघांचे रिपोर्ट कोेरोना बाधित आल्याचे समजताच पोलिस, महसुल व आरोग्य विभागाची धांदळ उडाली. त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर हा प्रकार बाहेर आला. आता संगमनेरमध्ये आरोग्या विभागाने योग्य पाऊल उचलले असून संबंधित परिसरावर त्यांनी करडी नजर ठेवली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जामखेडमधील 51 मश्चिदींना सिल केले असून संगमनेरात देखील ही खबरदारी घेण्यात आली आहे.


दोन पोलीस अधिकारी दवाखाण्यात.!
दरम्यान जेव्हा या टिमला ताब्यात घेण्यात आले तेव्हा दोन पोलीस अधिकारी निगटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आले होते. एक खबरदारी म्हणून त्यांच्या देखील तपासण्या करण्यात येणार असून पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. पोलिसांचे केवळ कौतुक होत असून त्यांच्या आरोग्याबाबत कोणी ठोस पाऊले उचलण्यास तयार नाही, किमात त्यांना 50 लाखाच्या विम्यात तरी सामाविष्ट करून घ्यावी. अशी मागणी या निमित्ताने पुढे येऊ लागली आहे.

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)