बहुचर्चीत दुधगंगा पतसंस्था घोटाळ्यातील कॉंग्रेसचे भाऊसाहेब कुटे अटक, पळून पळून दमले आणि हजर झाले.! 80 कोटीचा अपहार.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील बहुचर्चित दुधगंगा पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी काँग्रेसचे माजी जिल्हापरिषद सदस्य भाऊसाहेब दामोदर कुटे (रा.गणपतीमळा सुकेवाडी,ता. संगमनेर) हे स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात आज हजर झाले आहे. ते गेली सहा महिन्यांपासून फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होती. ते आज गुरुवार दि. 23 मे रोजी दुपारी 1 वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 दरम्यान 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी लेखा परिक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये चेअरमन,मॅनेजरसह 21 जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी लहानु गणपत कुटे,सोमनाथ कारभारी सातपुते,उल्हास रावसाहेब थोरात,अमोल प्रकाश क्षीरसागर यांना तात्काळ अटक करण्यात आली होती. मात्र, भाऊसाहेब कुटे हे फरार होते.त्यांना आज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुधगंगा पतसंस्थेसमोर शेकडो लोक येऊन टाहो फोडत होते. कोट्यावधी रुपये स्वतःच्या घशात घालुन फरार झालेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा आज अखेर जेरबंद झाला आहे. याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा नगर करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र निकम हे लेखापाल असुन त्यांच्याकडे दि.1 एप्रिल 2016 सालापासून दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची जबाबदारी शासनाने टाकली होती. संस्थेचे चेअरमन व मॅनेजर यांनी काळेबेरे काम सुरू केले असता त्यांचे लक्षात आले की, येथे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार असल्याचे लक्षात येत होते. यात ठेवीदाराने केलेली पावतीची मुदत संपून देखील ती रक्कम ठेवीदारांना न देता बोगस सही करून रकमा काढण्यात आल्या आहेत. ही रक्कम चेअरमन भाऊसाहेब कुटे, मॅनेजर विठ्ठल गुंजाळ अकाऊंटट भाऊसाहेब गायकवाड यांनी 3 लाख 96 हजार 425 इतकी रक्कम अपहार केली. बोगस मुदत ठेव युनियन बँक ऑफ इंडिया खाते निर्माण करून केलेला अपहार 19 कोटी 26 लाख 90 हजार 368 रुपये इतका तर व्याज नावे करून केलेला रकमेचा अपहार 2 कोटी 72 लाख 21 हजार 968 रुपये इतका संस्थेचे चेरमन भाऊसाहेब कुटे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाचा विरोध असताना कदम कुटुंबातील सदस्यांना 18 कोटी 30 लाख 42 हजार 901 रुपये दिले. यामध्ये देखील अपहार झाला.
संस्थेचे चेअरमन येथेच थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील कायद्याच्या चौकटीत बसत नसताना कर्ज दिले. कॅश क्रीडीट व फिक्स लोन कर्ज वितरित केले हा अपहार तब्बल 12 कोटी 4 लाख 28 हजार 866 इतका आहे. व्यक्तीगत शुभेच्छा जहिराती वर्तमान पत्रात प्रसिद्ध केल्या ते देखील 6 लाख 90 हजार 719 इतका आहे. चेतन कपाटे यांनी संस्थेचे विविध बँकेतील बचत व करंट खात्यावरून चेक व आरटीजीएस द्वारे रकमा वर्ग केल्या आहेत हा अपहार 2 कोटी 85 लाख 6 हजार 225 इतका आहे. बँक ओहरड्राफ कर्ज घेतलेला अपहार 19 कोटी 60 लाख 82 हजार 79 इतका तर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे हे महाशय इथेच थांबले नाही तर संस्था आपल्या मालकीची असल्यासारखे वागले त्यांनी वैयक्तीक खर्च महसुली खर्चात भरीत करून 81 लाख 18 हजार 652 रुपये इतका केला. असा एक ना दोन तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार या संस्थेत 21आरोपींनी केला.
दरम्यान, दुधगंगा संस्थेचे चेअरमन हे काँग्रेसचे जिल्ह्यापरिषद सद्स्य होते. त्यांना आ. थोरात साहेबांचे विश्वासु मानत होते. एकीकडे थोरात साहेब अगदी सुतासारखा सरळ कारभार चालवतात तर कार्यकर्ते असा अपहार करत असेल तर हे दुर्दैव आहे. साहेब येवढा विश्वास ठेऊन गावांचा कारभार चालवायला देतात त्याचा फायदा असे लबाड लोक घेतात गोंडस नावाने पतसंस्था खोलतात. मोठे होण्यासाठी तेथील मोठ्या रकमा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात. एक वेळ अशी येते की, कुंपनच शेत खाऊ लागतात. तेव्हा घशात घातलेल्या रकमांचा ताळमेळ लागत नाही. नंतर डोईजड झालेले आकडे पाहुन मी नाही केले अशी री ओढत संचालक मंडळ नाकाराचा पाढा म्हणते. मात्र, शेतकरी, मजुर, कामगार,व्यापारी हे आपल्या घामाचे पैसे मोठ्या आशेने तेथे ठेवतात आणि नंतर घोटाळे, अपहार, फसवणुका झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळु सरकते. त्यामुळे, पैश्याची गुंतवणूक करताना सावधानता बाळगली पाहिजे. आता दुधगंगा पतसंस्थेत देखील असाच घोटाळा झाला आहे. येथील मॅनेजर चेअरमन अन्य 19 जणांनी ही पतसंस्था स्वतःच्या घशात घातली आणि आजही ज्या शेतकऱ्यांनी पैसे ठेवले ते रडत आहेत.