संगमनेरच्या उमेदवारांकडून बी.जे. खताळ पाटलांचा अपमान होतोय.! म्हणून मी भाजपाचा राजिनामा देतोय - नातू विक्रम खताळ
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर विधानसभेत मतदानाचा एक-एक दिवस जवळ येत आहे. तस-तसा आरोप प्रत्यारोप होत आहे. स्व.बी.जे. खताळ पाटील यांचे नातु विक्रम खताळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अमोल खताळ यांचे नाव न घेता टिका केली आहे. बी.जे.खताळ हे महाराष्ट्रातील मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सर्वजण नाव व फोटो वापरू शकता. पण, तुम्ही नातू म्हणता आणि फोटो कुठे लावतात. त्यांनी फोटो तरी मोठा लावून त्यांचा मान त्यांना मिळायला पाहिजे होता पण तसे होताना दिसले नाही. खरंतर, तालुक्यात महसूल विभागात ४२ ब चे प्रकरण बंद आहे ते एकाच नावाने निघत होते. तहसीलदार प्रांत यांना विचारले तर ते एकाच नावाचा वापर करत असल्याचे लक्षात येईल. आरटीआयचा अर्ज टाकून चुकीचा वापर करून ब्लॅकमेल करणे असे उद्योग एका नावाकडून सुरू असल्याने कोणी व्यक्तीने खताळ आडनावाची बदनामी करू नये असे वाटत होते. त्यामुळे, अनेक घटनांना त्रासाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय विक्रीमसिंह खताळ यांनी घेतला आहे. असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
विक्रमसिंह खताळ पाटील पत्रकार परिषदेत पुढे बोले की, मी भाजपमध्ये उत्तर महाराष्ट्र आयटी सेलचे सहसंयोजक म्हणून काम करत होतो. हे काम करत असताना विखें पटलांशी संबंध आला. आजोबांपासुन विखें पटलांसोबत संबंध होते. पण, जे नातं आहे ते नात जपायचं काम एकाच बाजूने होत होते. चुकीचं काम करणाऱ्याला प्रोत्साहन मिळत होते. त्यांनी काही कृत्य केले. ज्यांच्यामुळे आमच्या घराचे नाव फार ऐरणीवर आले होते. प्रशासनाकडून मला खुप वेळा तक्रारी आल्या यामध्ये तुमचा काही संबंध आहे का? अनेकवेळा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण, आपण तोंड बंद करणार तरी कोणाची-कोणाची. त्यामुळे, हा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसमध्ये येत असताना चुकीचा मेसेज गेला की, मला तिकीट नाकारलं म्हणून हा निर्णय घेतला. हा चुकीचा मेसेज होता. मला तिकीट पाहिजे असे कुठे ही बोलो नाही. विखें पाटलांना देखील असा मेसेज किंवा बोलणे केले नाही. मी काम करत राहणार आहे. त्यामुळे, तिकीट नाकारलं म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो नाही.
दरम्यान, खताळ परिवारात जेव्हा तिकीट देताय. तेव्हा आमची एक इच्छा होती. की, आम्हाला विचारावं तुम्हाला नाव पाहिजे की वलय पाहिजे. तसं झाले नाही. मंग नाव घेऊन त्या वलयचं वापर करणं हे किती योग्य आहे. शेवटी हेच म्हणावं लागेल ज्या पक्षाची नाव चोरण्याची ओरड आहे ती संगमनेरात देखील नाव चोरले आहे. बी.जे. खताळ पाटील यांची जी संस्कृती आहे. त्याची पूर्ण दिशा बदलायचा जो प्रयत्न सुरू होता. ते मला सहन झाले नाही. त्यामुळे, काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक नवीन प्रश्न उपस्थित होताय पण योग्यवेळी उत्तर देईल. खरंतर, १९८२ साली बी.जे. खताळ पाटील यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. माझे वडील स्व. सतीश खताळ पाटील हे सुद्धा काँग्रेसमध्ये काम करत गेले. त्यांना वेळोवेळी संधी मिळत गेल्या. पण, दादांनी एकच भूमिका ठेवली. आता राजकारण आमचं संपलं. मला पुढे काही करायचं नाही.
खरंतर, राजकारणाची एक दिशा बदलत चालली होती. विचार बदलत चाले होते. दादांना काँग्रेसमध्ये त्रास झाला म्हणून थांबले. ही शंभर टक्के चुकीची माहिती. त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. बी.जे. खताळ हे महाराष्ट्रातील मोठं व्यक्तीमत्व आहे. आपण सर्वजण नाव वापरू शकता. फोटो वापरू शकता याबद्दल माझी कुठलीही हरकत नाही. पण, तुम्ही नातु मानतात आणि फोटो कोठे लावतात. तो फोटो तर मोठा लावा. त्यांचा मान त्यांना मिळाला पाहिजे एवढेच माझे प्रामाणिक मत आहे. पण, बोगस पण मला आवडत नाही. पेमगिरीच्या सभेत बी.जे. खताळ पाटील यांचा उल्लेख केला. त्यांनी मोठी कामे केली आहे. तो उल्लेख करू शकतात. पण, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. मी पद म्हणून काँग्रेसमध्ये आलेलो नाही. थोरात साहेबांना वाटले तर जबाबदारी देतील असे त्यांना पत्रकार परिषदेत काँग्रेस मध्ये येण्याचे कारण सांगितले.