महाविकास आघाडीचे सरकार येणार मग लहामटे व पिचडांना मतदान करुन फायदा काय? विकास करायचा म्हणून पुन्हा गद्दारी का?
सार्वभौम (अकोले)-
राज्यातील जे जे एक्झिट पोल पाहिले आहेत, तेथे सगळीकडे महाविकास आघाडी येणार असे तज्ञांनी सांगितले आहे. इतकेच काय.! अनेक आमदार, खासदार हे भक्तांच्या खेटा घालतात, त्यांनी देखील महाविकास आघाडीचे सरकार येणार असे सांगितले आहे. मग आता अकोले तालुक्यातील मतदारांना प्रश्न पडतो. की, २०१९ मध्ये वैभव पिचड म्हणाले मी राष्ट्रवादी सोडून भाजपात जातो. कारण, मला विकास करायचा आहे. त्यांनी गद्दारी केली म्हणून डॉ. लहामटे यांना निवडून दिले, ते २०२२ पर्यंत निष्ठावंत होते. मात्र, अचानक काय एकदम ओके झशले हे सर्वांना माहित आहे. ते देखील म्हणाले. मला विकास करायचा आहे. म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून दादांसोबत जातो. मग आता प्रश्न पडतो. की, या दोघांना मते दिली तरी ते विकास करायला पुन्हा गद्दारी करणार नाही याची शाश्वती काय? त्यामुळे, मविआचे उमेदावर यांना राम कृष्ण हरि आणि वाजवा तुतारी..!! अशा प्रकारचा सुर मतदारांमधुन बाहेर पडता आहे.
लाडकी ताई, फक्त एकदा विचार कर..!!
लडकी बहीण म्हणून तुला फक्त १५०० रुपये दरमहा मिळाला. पण, तुला पैसे देण्यासाठी या राजकारण्यांनी १ लाख ३० कोटी रुपयांचे कर्ज या महाराष्ट्रवर केले आहे. पैसे द्यावेच, हरकत नाही. पण, ते नियोजनपुर्वक द्यावे, कर्ज काढून नव्हे.! त्यामुळे, ३ हजार रुपये नियोजनपुर्वक महाविकास आघाडी लाडक्या बहिनींना देणार आहे. ३ लाखांचे कर्जबील तुझ्या धन्याचे माफ करणार आहे, आरोग्य विमा, पिक मालास हमीभाव, रोजगार आणि अनेक गोष्टींच्या सुविधा ताईला मिळणार आहे. पण, फक्त एकदा विचार कर.! मंत्रीमंडळात एक मंत्री दोन उपमुख्यमंत्री, अवघ्या २८८ आमदारांमध्ये फक्त तीन डोक्यांनी राज्य चालविले आहे. तीन वर्षे होऊन गेले, अजून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही. फक्त प्रशासन राज्य चालवत आहे. मग ही लोकशाहीची गळचेपी नाही तर काय आहे? ही हुकूमशाहीकडे वाटचाल नाही तर काय आहे? पक्ष कोणाचे?, चिन्हा कोणाचे? आमदार पात्र की अपात्र? यावर अडिच वर्षापासून सुनावणी सुरु आहे. आता आमदारांची वेळ सुद्धा संपून गेली. आता दुसरे आमदार आणि दुसरे सरकार येईल. त्यामुळे, महिन्याचे पंधराशे घेऊन पुन्हा तेच दिवस आणायचे का? ताई याचा जरा विचार कर, आणि मग मतदान कर..!
ताई बघ, या प्रश्नांचे उत्तर मिळतेय का?
ताई १ हजार ५०० दिले. पण, तेलाचे भाव किती वाढले? सोयाबीनला बाजार आहे का? कांद्याला भाव आहे का? तुझ्या भावाला, बहिनीला रोजगार आहे का? शेतकरी सुखी आहे का? स्वयंपाक घरात शांती आहे का? तुझा मुलगा ठेकेदार असेल तर त्याच्या कामाची बिले निघाली का? तुझ्या घरातील कोणी सरकारी नोकर असेल तर त्यांचे पगार झाले का? जर लाडकी बहिन इतकी प्रिय होती तर सरकार स्थापन केल्या-केल्या ही योजना सुरु का केली नाही? मग १ हजार ५०० साठी आपली लोकशाही आणि मत विकणार का? जातीयवाद, धर्मवाद यांना पाठबळ देणार का? आपली लेकरं उपाशी ठेवून गुजरातला प्रकल्प नेणार्यांना मत देणार का? संविधान बदलु पाहणार्यांना मत देणार का? सत्तेसाठी पक्ष फोडाफोडी करणार्यांना मत देणार का? गुवाहटी आणि झाडी यात ५० खोके एकदम ओके म्हणणार्यांना मत देणार का? ताई दिड हजार रुपयात तुझ्या मताची किंमत आणि लोकशाहीची ताकद गहाण ठेवणार असेल तर मत देताना पुन्हा एकदा विचार केला पाहिजे.
पुन्हा विकास करायला गद्दारी.!
खरंतर या तालुक्याच्या राजकीय खळबळीला वैभव पिचड जबाबदार आहेत. जर त्यांनी भाजपात प्रवेश केला नसता. तर, लहामटे यांचा उदय झालाच नसता. ना इतका तालुका खळबळुन निघाला असता. पिचड विकास करायला भाजपात गेले आणि त्यांना नावे ठेवत राजकारण करणार्या लहामटे यांनी तरी विशेष वेगळे काय केले? त्यांनी देखील गद्दारी केली आणि मी विकास करायला अजित दादांसोबत चाललो आहे.असे म्हणत वैभव पिचड यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून विकास करायला दादांसोबत गेलो असे म्हणू लागले. म्हणजे ही दोघे एकाच माळीचे मणी आहेत. त्यामुळे, उद्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. येथे अमित भांगरे शाश्वत महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. त्यामुळे, आपले मत वाया घालु नका. राम कृष्ण हरी म्हणा आणि तुतारी चालवा...!!
आजारपणाचे भावनिक राजकारण नको.!
वैभव पिचड यांनी उमेदवारी केली खरी. तो त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र, त्यांची सध्या विकासावर बोलण्यापेक्षा फक्त आदरणीय मधुकर पिचड साहेब यांच्या आजारावर राजकारण सुरू केले आहे. तुम्हाला जनतेने पाच वर्षे निवडून दिले होते. त्या काळात तुम्ही काय केले? यावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. आदरणीय पिचड साहेब बरे व्हावे म्हणून गावोगावी लोकांनी आरत्या केल्या. पण, त्यातून राजकीय वातावरण निर्माण करुन आमदार होण्याची स्वप्न पहात असेल. तर, ते चुकीचे आहे. हे कटू असले तरी सत्य आहे. की, आजाराचे राजकारण व्हायला नको. साहेब लवकर बरे व्हावे आणि त्यांचे पाय तालुक्याच्या मातीला लागावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण, त्यांच्या नावाखाली राजकीय वातावरण तयार करुन लोकांची सहानुभूती निर्माण करणे. हे नैतिकतेला धरुन नाही. अकोले तालुक्यातील जनता स्वत: हे मत मांडत आहे.