तिने प्रपोज करुन माझ्यावर खोटे प्रेम केले म्हणून मी आत्महत्या करतोय, पण तीला दोषी धरुन नका.! तिच्यामुळे, स्टॅक मार्केटमध्ये गेले लाखो रूपये.!
सार्वभौम (नेवासा) :-
एखाद्या प्रमाणिक आणि प्रांजळ प्रेम करणार्या व्यक्तीला प्रेमात धोका बसला. की, त्याचे आयुष्य कसे अस्तव्यस्त होते याची ही प्रचिती आहे. खरंतर मुलींवर बलात्कार होतात मग मुलांवर देखील होत नाही का? त्यांना चारित्र्य, इज्जत, भावना, प्रतिष्ठा नाही का? आपल्या देशात इज्जत, कायदा, पोलीस, मीडिया फक्त मुलींसाठीच असतो का? असे अनेक प्रश्न या समाज व्यवस्थेला विचारत देवेंद्र मोहिनीराज थोरात (वय २३, रा. तारापार्क, नेवासा) या तरुणाने प्रवरासंगम येथील पाण्यात जलसमाधी घेतली. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी जेव्हा सुसाईट नोट लिहीली, तेव्हा त्याने आपली प्रेयसीला दोष न देता स्वत:ला दोष दिला आहे. कारण, तिने प्रपोज केला तेव्हा मी नको म्हणायला हवे होते असे दु:ख त्याने मांडले आहे. तर, केवळ प्रेमाच्या नैराश्यातून स्टॅक मार्केटमध्ये लाखो रुपये गेले असे देखील त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चिठ्ठीत म्हटले आहे की....!!
माफ करा, मी असा अविचारी निर्णय घेतोय. पण मला आता काहीच सुचत नाहीये. खर सांगु, मी खूप थकलोय या सगळ्यामध्ये अस खोट-खोट हसन, सगळं ठीक होईल असं बोलून, स्वतःचीच समजुत काढणं. बस.! आता अजून ताकद नाही राहिली माझ्यात. प्रत्येकाच्या आयुष्यात दोन निर्णय फार महत्त्वाचे असतात. एक लग्न आणि दुसरं करिअर, दुर्दैवाने माझे दोन्ही चुकले. लग्नाच्या बाबतीत माझे प्रेम आणि करिअर मध्ये स्टॉक मार्केट.!!
मला समजत नाही. की, मी त्या मुलीचा प्रपोज ऍक्सेप्ट का केला? का तिच्या सगळ्या खोट्या अश्वासनावर विश्वास ठेवला? का ती इतक्या वेळा खोट बोलत असताना देखील मी प्रत्येक वेळी मागचे सगळे विसरून तिला माफ करत राहिलो? का तिचे सगळे हट्ट पुरवून तिला हवं-नको ते सगळं देत राहिलो? तिच्या सगळ्या प्रोब्लेममध्ये तिची साथ देत राहिलो? (अर्थात मी केलेलं बोलून दाखवतोय अस मुळीच नाही, कारण मी तुझ्यासाठी हे केलं आहे. आणि तू माझ्यासाठी काय केलेस? किंवा अपेक्षा ठेवली तर मग तिथे प्रेम नाही तो तर व्यवहार होईन ना...) जेव्हा तिने स्वतःच्या चुका कबूल केल्या आणि बोलली की, देवेंद्र मी तुला प्रपोस केले, लग्नाचे खोट नाट प्रोसिस केलं.., तुझ्या आयुष्याच वाटोळं केलं तुला आता माझं काय करायचं ते कर. जी शिक्षा वाटेल ती दे, हात जोडुन गळ्यात पडून रडून बोलत होती आणि तेव्हा वैभव, काव्य, प्रिया हे सगळे सांगत होते तिला काहीतरी कर. हान, मार काय कराचय ते कर तुझ्या मनातला सगळा राग काढ. तिला आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा दे.! पण अस असताना का मी तिला काहीही शिक्षा न देता का जाऊ दिल?
एवढ करुणही तीच म्हणणं हेच की, हे जे घडतय ते कुठे बोलू नको. नाहीतर, सगळ्या नेवशात माझी मझ्या घरच्यांची इज्जत जाईल. मुळात ह्या सगळ्यात इज्जत तर माझी गेलीये. बलात्कार तर माझा झालाय. पण काय हे.! आपल्या देशात इज्जत, कायदा, पोलीस, मीडिया फक्त मुलींसाठीच असतो का? ती स्वतःहून आली प्रसोज केला, लग्नाच बोलणं आणि शेवटी वेगळं होणं... हे सगळं तिने केला. मग या सगळ्यात माझी चूक काय होती? तेच कळलं नाही मला? हे प्रश्न मला खूप भयंकर त्रास देताहेत.
आणि दुसरं शेअर मार्केट. ट्रेडिंग त्याबद्दल आता तर काय बोलणार मी. जानेवारीमध्ये लाखो रुपये कमावले होते. तेंव्हाच सगळे पैसे देऊन टाकले असते तर किती बर झालं असत. पण अजून थोडे अस करता-करता एवढा मोठा राडा झाला. तरी बबलू भाऊ सांगत होते. ८ ते १० लाख झाले आता बस कर. पण मी ऐकलं नाही, तिचा राग मी मार्केट वर काढला. अजून ओव्हर ट्रेड करत गेलो. त्यामुळेच आज मी सगळच गमावून बसलो. मी साफ चुकलो. पोरगी आणि पैसा दोन्ही ठिकाणी सपशेल हरलो. एका ठिकाणी मी फसत गेलो आणि दुसरीकडे ती फसवत गेली...!!
अस म्हणतात, सबकुछ खो देने से बढकर क्या खो देना हैं.! तो वो उमिद खो देने जिसके बलबुते पर तुम सबकुछ वापस हासील कर सकते हो..! पण आज ती उमिद सुद्धा नाही राहिली माझ्याकडे. जेवढा स्वतःला सावरण्याचा पयत्न करतो, तेवढाच खचत चाललो. सगळीकडून हरलो अस वाटतंय मला. शारीरिक आणि आर्थिक अडचणी तर आहेतच पण त्याहुन हजार पटीने जास्त मानसिक त्रास होतोय. मी त्या दिवशी कॉलेजवर तिलापण बोललो की आरशा पुढं उभं राहिल्यावर स्वतःच्या नजरेला नजर देण्याची पण हिम्मत नाही राहिली माझ्यात. मी ना मम्मीची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो, ना प्रेयसिचे खर रूप ओळखू शकलो. ना करिअर उभा करू शकलो. या पडत्या काळात सुद्धा ज्यांनी साथ दिली त्याचा मी मन:पुर्णक आभारी आहे. पण माफ करा मी तुमच्या साठी काही करू शकलो नाही. मला जगण्याचं अधिकार नाही. मी खूप विचारांती हा निर्णय घेतोय आणि यासाठी कोणालाही जवाबदार धरू नये अगदी माझ्या प्रेयसिला सुद्धा नाही. चुक माझी आहे. की, मी तिला होकर दिला होता. सगळी कडेच चुकत गेलो. मला क्षमा करा, मी जग सोडतोय..!!!
आता वरील मथळा वाचल्यानंतर जे लोक प्रेम आणि ऑनलाईन उद्योगात मग्न आहेत. त्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. पबजी, जंगली रमी, बिंगो, शेअर मार्केट आणि ऑनलाईन चालणार्या सर्व मोहमायेच्या जाळ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. तर महत्वाचे म्हणजे आजकाल खरे प्रेम वैगरे ह्या संकल्पना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे, तात्विक भावनेपोटी स्वत:चा जीव जाईल इतक्या परोकोटीचा निर्णय तरुण-तरुणी यांनी घेणे चुकीचे आहे. आज एक देवेंद्र गेला. मात्र, त्याने हजारो आणि लाखो तरुणांना संदेश दिला आहे. यातून कॉलेजकुमार-कुमारी धडा घेतील अशी आशा आहे.
यात सर्वात महत्वाचे म्हणजे. देवेंद्र याने आत्महत्या केली. ती का? याची दोन कारणे स्पष्ट आहेत. स्टॅाक मर्केटमध्ये देखील तो का वाहवत गेला हे देखील त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, पोलिसांनी यावर योग्यती कारवाई करणे गरजेचे आहे. तो जरी म्हटला यात कोणी दोषी नाही. तरी देखील एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीवर वार केले, जिवघेणा हल्ला केला आणि तो मृत्युपुर्व जबाबात सर्व कथन करुन जातोय आणि शेवटी तो म्हणतो कोणाला दोषी धरु नये. तर, यात हल्लेखोर दोषी नाही का? याचे ऊत्तर आता पोलिसांनी शोधायचे आहे. देवेंद्रने आत्महत्या केली नाही. तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले आहे. हे यातून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे, गुन्हा आणि त्यामागील हेतू स्पष्ट आहे. यात जर पालक फिर्यादी होत नसतील तर पोलिसांनी फिर्याद द्यावी असे मत समाजिक कार्यर्क्त्यांनी व्यक्त केले आहे. अन्यथा न्यायालयीन मार्गाने यात देवेंद्रसारख्या हुशार, शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.