...अखेर झेडपीचे मा. सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.! नेत्यांना अॅट्रॉसिटी नको मते हवेत.!
सावभौम (अकोले) :-
जिल्हा परिषदेचे सदस्या सुष्माताई बाजीराव दराडे यांना विकास कामांची माहिती विचारण्यासाठी आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे डामसे शेतकरी गट शेणीत या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नामदेव आनंदा डामसे हे गेले होते. यावेळी त्यांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांनी यांनी शिवीगाळ करुन घरातून हाकलून देत बळजबरीने त्यांच्या मोबाईलमध्ये माफीचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला. याप्रकरणी बाजीराव दराडे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नामदेव आनंदा डामसे (रा.शेणीत, ता. अकोले) व सागर विष्णु तळपाडे (रा. सांगवी. ता. अकोले) ही दोघे रविवार दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झेडपीच्या समशेरपूर गटाच्या सदस्या सुष्माताई बाजीराव दराडे यांच्यासोबत समशेरपूर गटातील शेणीत गावचे पंचक्रोशीतील रखडलेल्या विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. तेव्हा बाजीराव दराडे यांना देखील हे दोघे प्रत्यक्ष भेटले होते.
दरम्यान त्यांना डामसे यांनी विचारणा केली की, साहेब.! मार्च 2020 मध्ये शेणीत गावातील पाणी पुरवठा नळ योजनेचे आपण उद्घाटन केले होते. तसेच देवगाव फाटा ते डामसेवाडी डांबरीकरण रस्ता उद्घाटन केला होता. त्या कामांच्या उद्घाटनाच्या वेळी काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदरचे काम अद्याप सुरू न झाल्याने त्या रोडला फार खड्डे पडले आहेत. परिणामी त्यामुळे, संबंधित रस्त्याने शेती आवजारे आणि वाहनांना जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असून तेथे किमान माती किंवा मुरूम तरी टाका. हे सर्व संभाषण सुरू असताना हे लोक आपल्या चर्चेची शुटिंग काढत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला व ते दोघांवर अचानक धावून गेले. आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा. या दोघांना अश्लिल शिवीगाळ करीत दराडेला जाब विचारण्यासाठी इथवर येण्याची तुमची हिंमत कशी झाली असे म्हणून शिवीगाळ करत डामसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आत्ताच्या आत्ता येथून चालते व्हा. नाहीतर ठार मरुन टाकीन असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर दराडे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बळजबरीने शुटिंग सुरू केली व मी सांगेल त्याप्रमाणे बोल असे म्हणून पुन्हा दमदाटी केली. त्यानंतर मोबाईलमध्ये शुटिंग काढत डामसे यांच्याकडून वदून घेतले की, मी दारुच्या नशेत चुकून बाजीराव दराडे यांच्या घरी आलो. आता माझी चुक झाली, पुन्हा मी त्यांच्या घरी येणार नाही असे वदून घेत डामसे यांच्या ताब्यातील मोबाईल काढून घेतले. त्यातील सर्व डाटा डिलीट करुन दुसर्या दिवशी ते मोबाईल सांगवी येथे बाजीराव दराडे यांनी स्वत: आणून दिले. त्यामुळे, त्यांना मला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली असून माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे. असे डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान रविवारपासून हे प्रकारण सोशल मीडियावर फिरत होते. खरंतर अशा प्रकारची तक्कार आल्यानंतर एक जनआंदोलन उभे करावे लागते आणि मग त्याची दाखल घेतली जाते ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.एरव्ही पोलीस कित्तेक संदिग्ध गुन्हे दाखल करुन घेतात. मात्र, तेव्हा कधी विचारपूस होत नाही. हा प्रकार इतका भयानक असून देखील त्यासाठी सगळा आदिवासी समाज एकवटावा लागतो. ही किती मोठी शोकांतीका आहे. विशेष म्हणजे पहिल्यापासून यात मधुकर तळपाडे यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. तर के. ए गृप येथून माहि धोंगडे, स्वप्नील धांडे, अतुल धांडे, रामू इदे, पुंडलिक भांगरे, गणेश खाडे, रवी पेंढेकर, शोभा घाणे, कल्याणी धोंगडे यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर एक चळवळ उभी केली. त्यानंतर आ. किरण लहामटे, अशोक भांगरे यांच्यासह अनेकांनी हस्तक्षेप केला आणि आज स्वत: कादेशीर रित्या पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांनी येऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास हाती घेतला आहे.
आता यात दुसरा चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे आदिवासी समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण हवे आहे. बाजीराव दराडेवर अॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा यासाठी गेल्या पाच दिवस रणकंद माजविले. मात्र, यातीलच काही आदिवासी नेते उद्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा यासाठी पुढाकर घेऊन आंदोलन करणार आहेत. महत्वाचे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यात तिळमात्र शंका नाही. त्यासाठी सुज्ञ आदिवासी व मागासवर्गीय प्रत्येक समाज आग्रही आहे. मात्र, अॅट्रॉसिटी फायदा घेणारे हे काही दुटप्पी नेते निवडणुका समोर ठेऊन डॉ.बाबासांहेबांनी तुम्हाला दिलेल्या हक्काला मतांच्या राजकारणासाठी चवी सारखे चघळताना दिसत आहेत. आदिवासी सामाज्याच्या हक्क व न्यायी संरक्षणासाठी अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ आता सामान्य आदिवासी समाज एकवटेल का? असा प्रश्न रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्वांचे चेहरे उद्याच्या आंदोलनात समोर येणार आहे.
""""""""""""""""""""""""""""""""""
प्रिय वाचक मित्रांनो.!
सांगताना अत्यानंद होतो की, आज या बातमीच्या रुपाने रोखठोक सार्वभौमने १ कोटी वाचकांचा पल्ला गाठला आहे. गेल्या १५ महिन्यांपुर्वी जन्माला आलेले हे पोर्टल अवघ्या ८५१ बातम्या व अभ्यासपुर्ण लेखात १ कोटी वाचक करु शकले. कोणाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता दिवसरात्र आम्ही आपल्या सेवेत होतो. म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.! त्याप्रमाणे एक संपादक म्हणून मी फार काही नाव कमविले आणि आरोग्य गमविले आहे. अगदी काल परवा मी ८ दिवस आॅक्सिजनवर होतो. तरी आमच्या बातम्यांचा खंड पडला नाही. नि:शब्द कष्ट घेऊन आजवर अगदी निर्भिड लिखान आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे.
अर्थात माझे प्रतिनिधी सुशांत पावसे, आकाश देशमुख, महेश जेजुरकर, शंकर संगारे, सुशांत आरोटे यांच्यासह जे कोणी ज्ञात अज्ञात वाचक ही लिंक शेअर करतात. हे सर्व श्रेय मी त्यांना देतो. कळत-नकळत आमच्याकडून आपले मन दुखावले गेले असेल. कधी अनावधानाने चुकीचे वृत्तांकन झाले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.
आज १ कोटी वाचकांचा गुणवत्तापुर्ण वर्धापन दिन म्हणून आम्ही एक विशेष पुरवणी काढत आहोत. रोखठोक सार्वभौमने अनेकांना मोठे केले आहे. मात्र, हे फुकटचे मोठेपण मिरवणारे आता आमच्या लक्षात आले आहे. तरी जे आमचे हितचिंतक आहेत. त्यांनी स्वत:हून जाहिरातीसाठी संपर्क साधावा. तसेच १ कोटी वाचकांच्या निमित्ताने आम्ही "वॉरियर्स" म्हणून काही निवडक व्यक्तींना सन्मानित करत आहोत. तुम्हाला कोणचे योग्य नाव वाटले तर सुचवा.
जाहिरातीसाठी संपर्क अकोले : ८८८८७८२०१०, ८२०८५३३००६, संगमनेर : ८३०८१३९५४७, राजूर ९०११२२३३१२, अकोले ९३७३२३९१४.
संपादकीय
सागर शिंदे