भंडारदरा तुडूंब भरले.! नदिकाठच्या 83 गावांनो सावधान.! धरण भरण्याचा 1969 ते 2020 चा इतिहास नक्की वाचा.
- सागर शिंदे
भंडारदरा (प्रतिनिधी) :-
गेल्या पंधरा दिवसांत अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. या परिसरात श्रावणसरींनी चांगलेच थौमान घातले होते. तर अन्यवेळी पावसाची रिपरीप सुरूच होती. त्यामुळे धरणात थेंबथेंब साचून भंडारदरा 11.29 टिएमसी भरला असून निळवंडे धरण 7.50 टिएमसी म्हणजे 90 टक्के भरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून रतनवाडी व घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. येथे तब्बल 83 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा पुर्णपणे भरुनही अजुनही पाण्याची आवाक रोज वाढत आहे. त्यामुळे येणारे पाणी आता 816 क्युसेक्स व निळवंड्यातून 22 शे क्युसेक्स असे 2 हजार 900 क्युसेक्स पाणी प्रवरेतून खाली सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाने अक्षरश: वाट पहायला लावली आहे. तर आता या पावसामुळे शेत हिरवाईने नटले असून डोंगर दर्यांमधून पांढरेशुभ्र धबधबे वाहत असून सह्याद्रीने हिरवा शालू नेसल्याचे दिसत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यावर्षी येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. अकोले, संगमनेर व मराठवाड्यासह एक कोटी लोकांची तहान भूक भागविणारा भंडारदरा धरण आज (दि.3) तुडूंब भरले. त्यामुळे वर्षभर लाखो शेतकर्यांची चिंता स्थिरावली आहे. या धरणातील आवक- जावक 15 ऑगस्टच्या आसपास सुरू होते. यापुर्वी 1967 ते 2019 या 42 वर्षाच्या काळात भंडारदरा धरण कधी भरले व कधी भरले नाही, याचा स्पेशल रिपोर्ट सार्वभौमच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
आज भंडारदरा धरण पुर्णत: भरल्याची माहिती अभियंते अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. अजुनही पाण्याची आवक थोडी-थोडी सुरू असून येणारे पाणी पावरहाऊस येथून प्रवरेत सोडले जात आहे. जसे रतनवाडी, घाटघर, साम्रद, जायनेवाडी, बिताका, मुतखेल, बारी, वाकी अशा पर्जन्यछायेच्या भागातून येणार्या पावसाच्या पाण्याची आवक लक्षात घेता जावक निच्छित केली जाते. तसे 15 ते 31 ऑगस्टपर्यंत 11.39 टिएमसी भडारदरा धरण फुल करण्याचे धोरण शासनाचे आहे. एरव्ही भंडारदरा धरण 15 ऑगस्ट रोजी भरते असे अंदाजे निर्धारीत झाले आहे. मात्र, यावर्षी हा इतिहास थोडा बदलला असून 16 ऑगस्ट नंतर धरणात पाण्याची निर्धारीत पातळी पुर्ण झाली. जर ऑगस्ट महिन्यात धरणाच्या भिंतीहून पाणी वाहीले नाही. तर शेतकर्यांच्या चिंता शिगेला पोहचलेल्या असतात. जर धरण भरण्याचा इतिहास पाहिला तर आजवर 43 वर्षाच्या काळात भंडारदरा एकून 11 वेळा भरलेला नाही. दि. 2 ऑगस्ट 1969 ते 70 पर्यंत धरण याच महिन्यात फुल भरले. मात्र, सलग तीन वर्षे म्हणजे 1972 पर्यंत पावसाने बळीराजाकडे दुर्लक्ष केले. परिणामी उभ्या महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावेळी फक्त 75 टक्के सरासरी धरण भरले होते. 1973 ला धरण भरले परंतु 74 ला पुन्हा दुष्काळमय परिस्थिती अकोलेकरांनी अनुभविली. त्यानंतर मात्र सलग 10 वर्षे म्हणजे 1984 पर्यंत धरण क्षेत्रात पाणलोट परिसर पहायला मिळाला. तर नंतर सलग तीन वर्षे म्हणजे 1985 ते 87 व 89 ला धरण पुर्णत: भरले नाही. परंतु त्यानंतर दरम्यान पाच वर्षाचा काळ शेतकर्यांच्या सुखाचा गेला. पाण्याचा तुटवडा फारसा जाणवला नाही. मात्र 1995 साली धरणाची भूक अपुर्ण राहिली. कारण त्यावेळी 9 हजार 498 दलघफुट पाणी धरणात साठले होते. तीच परिस्थिती 2 हजार दशकाच्या मुहूर्तावर झाली. तेव्हा धरण अवघे 8 हजार 851 टिएमसी भरले होते. त्यानंतर सलग 15 वर्षे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धरणाची आवक कायम राहिली. ती गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2019 पर्यंत. अशा पद्धतीने 42 वर्षात धरण प्लस- मायनसमध्ये होत राहिले. तर 43 वर्षानंतर धरण 16 ऑगस्ट रोजी तांत्रीकदृष्ट्या भरले तर आज पुर्णत: धरण ओव्हरफुल झाले आहे. मात्र, 31 ऑगस्ट पर्यंत जी आवक येत आहे. ती 816 क्युसेक्सने खाली सोडण्यात येणार आहे. तर एकंदरीत विचार करता 20 ऑगस्टनंतर भंडारदरा धरण ओव्हरफुल झाल्याचे अकडेवारीत निश्चित होते. तर 2009 मध्ये फक्त आक्टोबर महिन्यात धरण उशिराने भरले आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या आधी एकदाही धरण भरल्याची इतिहासात नोंद नाही.
तर आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर निसर्गाचे भविष्य आजवर कोणी वर्तवू शकले नाही. ना आपत्तीची कोणाला खबर असते. त्यामुळे, जर भंडारदर्याच्या पानलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाला तर कोणत्याही क्षणाला पाणी प्रवरेत सोडावे लागेल. त्यामुळे, जोवर पावसाळा आहे. तोवर प्रशासनाने जे नियम सांगितले आहे, ज्या सुचना दिल्या आहेत त्यांचे पालन करावे. भंडारदरा ते नेवासा या प्रवरेच्या प्रवाहात जे नदिकाठची गावे आहेत. त्यांनी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे, प्रशासनाने जी गावे निच्छित केली आहे. त्यांनी नदीपात्रात जाऊ नये, लहान मुलांना नदीवर पाठवू नये, धुणे धुण्यासाठी महिलांना नदीवर येणे टाळावे, शेतकर्यांनी त्यांची शेती अवजारे व संसाधने नदीकाठी ठेऊ नये. फार नदीकाठी शेत असेल तर त्यात पिक घेणे टाळले पाहिजे अशी काही खबरदारी अपेक्षित आहे. तर नदीकाठी कोणकोणती गावे आहेत. ती यादी देखील प्रशासनाकडे आहे.
त्यात भंडारदरा, रंधा खुर्द व बुद्रुक, शेलविहीर, माळेगाव, दिगंबर, चितळवेढे, निब्रळ, निळव़डे, विठे, म्हळदेवी, सावंतवाडी, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, उंचखडक बु व खुर्द, अकोले, टाकळी, सुगाव खुर्द व बुद्रुक, कळस, तर संगमनेर तालुक्यात दोन्ही धांदरफळ, वाडापूर, रायते, संगमनेर बु व खुर्द, जोर्वे, कणुली, दाढ, कोकणेवाडी, आश्वी, वाघापूर, शेडगाव, खराडी, मंगळापूूर कसारा दुमाला, आश्वी बु, तसेच राहाता तालुक्यात, दाढ, हाणुमंतगाव, पाथरे, दुर्गापूर, कोल्हार भगवती तर श्रीरामपूर तालुक्यात कडीत खुर्द व बुद्रुक मांडवे, कुराणपूर, लाडगाव, भेर्डापूर, मालुंजे, खिर्डी, वागी खुर्द व बुद्रुक, वळदगाव, उंबरगाव, तसेच नेवाशात पाचेगाव, चिंचबन, गोनेगाव, नेवासा खुर्द व बुद्रुक व बहिरवाडी राहुरी तालुक्यात देखील धानोरे, सोनगाव, सात्रळ, माळे डुक्रेवाडी, कोल्हार खु, चिंचोली, दावनगाव आंबी, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, करंजगाव, मालंजे, दरडगाव, महालगाव, लाख, सांक्रापूर, गंगापूर, पिंपळगाव फुगणी, माहेगाव अशी गावे नदीकाठी आहे.
निर्धारीत आवक पुर्ण झाली आहे..
यावर्षी धरणात पाण्याची आवक थोडीफार प्लस-मायनस झाली. मात्र, तरी देखील निर्धारीत वेळी धरणाने अधिकतम पातळी पुर्ण केली आहे. आता पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक लक्षात घेऊन पाणी पावर हाऊसमधून खाली सोडले आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे भडारदरा परिसरात पर्यटकांनी येऊ नये. सध्या धरणात 11.26 टिएमसी पाणी असून 31 ऑगस्ट नंतर आवक पाहून पाण्याचा विसर्ग ठरविला जाईल. मात्र, यावर्षी देखील धरण पुर्णत: भरले आहे. नदीकाठी जी गावे आहेत, त्यांना यापुर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर भंडारदारा किंवा पानलोट क्षेत्रात प्रवेश निशिद्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरी रहा काळजी घ्या.
- अभिजित देशमुख (अभियंता)
- सागर शिंदे
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)