शाहरुख खानच्या पोष्टहुन युवा शिवसैनिकास मारहाण तर दोन पाटीलक्यांच्या वादात कर्मचार्यास बांधून मारले.! साकुर अलर्ट
साकुर (प्रतिनिधी) :-
एकीकडे देशात व राज्यात कोरोनाशी युद्ध सुरू असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील साकुरपरीसरात दिवसाआड राजकीय व जातीय युद्ध सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गावात राजकीय मक्तेदरी समजणार्या पाटलांनी स्थानिक नागरिकांना राजकीय द्वेषापोटी बांधुन मारण्याचा सपाटा धरला आहे. तर, याच ठिकाणी शाहरूख खानवरुन दोन जातीत वादंग निर्माण होऊन युवा शिवसैनिकाला तुडविले जात आहे. त्यामुळे तेथे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसून येत असून प्रशासन मात्र राजकीय व्यक्तींच्या दबावाला बळी पडून निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटना एकाच गावातील असून पोलीस ठाण्यात साधी एनसी देखील दाखल झालेली नाही.
त्याचे झाले असे की, देशात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावागावात निर्जंतुकीकरणाची फवारणी चालु आहे. हे काम साकुर परिसरात सुरू असताना आमच्या भागात फवारा का मारला नाही. असे म्हणून गावात पाटीलक्या करणार्या एका तरुणाने संबंधित कर्मचार्यास चक्क बेदम मारहाण केली. फवारा संपला आहे. नंतर मारतो असे उत्तर येताच, या पुढार्याच्या नातवाचा इगो दुखावला गेला आणि त्याने या कर्मचार्यावर द्वेष धरुन चक्क त्यास रात्री बांधुन मारले. हा प्रकार गावातील प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधीस समजला असता त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना देखील मारहाण करण्यात आली.दरम्यान, या घटनेमुळे मंगळवारी (दि.31) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गावचे वातावरण तणावपुर्ण होते. आता पठारावर ही सगळी अराजकता माजून देखील तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की, बड्या नेत्यांनी कानाखाली खावून देखील साधी पोलीस ठाण्यात नोंद का झालेली नाही. तर, ही सर्व राजकीय गणिते असून यात काही लोक अवैध धंद्यांचे बादशहा आहेत. त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची! मात्र, देशात 144 कलम लागू असतांना इतका मोठा प्रश्न निर्माण होऊन देखील स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी केली असता आम्हाला काही माहित नाही. अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे, त्यांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
ही झाली एक घटना, तर दुसर्या घटनेत...
देश कोरोनाच्या संकटात असताना अनेक सेलिब्रिटींनी भरीव मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यात शाहरुख खानचे नाव कोठे दिसून आले नाही. तो बाहेरील देशाला मदत करतो, मग भारत अडचणीत असताना त्याची संवेदनशिलता गेली कोठे? असा सवाल एक युवा शिवसैनिकाने उपस्थित केला होता. ही बात काही तरुणांना खटकली आणि त्यांनी या सैनिकास भर रस्त्यावर हटकले. दोघे तोंडातोंडी आल्यानंतर आता होणार तरी काय? जात, धर्म आणि प्रांताचा उद्धार सोडून कोणी बोलायला तयार होईना. मग काय! वाद इतका विकोप्याला गेला की, एका जमावाने या सैनिकास चांगलाच चोप दिला. त्यानंतर दोन गट आमनेसामने आले. मात्र, पुढे परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आत काही बड्या व्यक्तींनी मध्यस्ती करीत वादावर पडदा टाकला.मात्र, त्यानंतर या शिवसैनिकाच्या दिमतीला शहरातील काही शिवसैनिक धावून आले. सोशल मीडियातून युवा शिवसैनिकास समर्थन मिळाले. मात्र, तोवर वेळ निघून गेली होती. त्यास चांगलाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मारा मिळाला. दरम्यान याबाबत पोलिसांना याची कोणतीही कल्पना नाही. खरंतर पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिलेले आहेत. एच.एम सारखे गुन्हे असतील तर त्याचा तपास थेट अधिकार्यांनी करावा. साधा अदखलपात्र नोंद झाली तरी किमान पीएसआय दर्जाच्या अधिकार्याने त्यात लक्ष घालावे. मात्र, घारगाव हाद्दीत या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. देशात आणिबाणीसारखी परिस्थिती ओढावलेली असताना एखाद्या तालुक्यात जातीय वादंग उभे राहता व ते दडपले जातात. ही दुदैवाची बाब आहे. अशा घटनांकडे पोलीस उपाधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा येणार्या काळात या घटनेचा उद्रेख कधीही रैद्ररुप धारण करू शकतो.
सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)