संगमनेरमध्ये बनावट दारुने घेतला तरुणाचा बळी.! तेरी भी चूप मेरी भी चूप.!

एक आखरी प्याला...!

सुशांत पावसे
संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                     अकोले तालुक्याच्या पाठोपाठ संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक महिती समोर आली आहे. शहरात लगतच्या गावांमधून बनावट दारुचा पुरवठा होत असून शहरातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारुची सप्लाय होत असल्याची माहिती समोर आली आहे. या बनावट दारुमुळे शहरातील एका 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची चर्चा सद्या जोरात सुरू आहे. एक तरुण गावात येतो काय आणि बनवाट दारू पिवून घरी जाऊन बसतो कोठे नाहीतर त्याच्या मृत्युची बातमी पसरते. हा प्रकार संशयास्पद वाटत असला तरी बस स्थानकाच्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी एका हॉटेलात व घरात हा प्रकार घडावा ही दुदैवाची बाब आहे. या घटनेनंतर तेथील मद्यविक्री कमी झाली असली तरी अगदी हकेच्या अंतरावर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, पोलीस उपाधिक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे व तहसिल असून देश बंद असताना हा प्रकार घडावा. ही बाब संगमनेरच्या चारित्र्यावर खरोखर चिखलफेक करणारी आहे. असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे. याबाबत पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत व पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे.

तुम्हाला एक गोष्टीची कल्पना असेल किंवा नसले. पण तुमच्या माहितीस्तव नमुद करावेसे वाटते की, इराणमध्ये जेव्हा जेव्हा कोरोना विषाणुची लागण झाली तेव्हा तेथे एक आफवा पसरली होती. की, दारु पिल्यानंतर कोरोना बरा होतो. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या आई वडिलांनीच आपल्या मुलांना दारू पाजली होती. छोट्या लेकरांपासून तर मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनी कोरोनाच्या भीतीने दारू पिली होती. अखेर झाले काय ? इराणमध्ये 3 हजार 500 मध्यपींना मृत्युला सामोरे जावे लागले. कारण इराणमध्ये दारु बंद असतांना काही समाजकंठकांनी पैशाच्या हव्यासापोटी मिथेनॉलच्या सहाय्यने बनावट दारु तयार केली होती. या विषारी द्रव्याची बाधा होऊन मृत्युचे ढिग पहायला मिळाले होते. इतकेच काय! हाच प्रकार नगर जिल्ह्यात देखील झाला होता. 


                 15 फेब्रुवारी 2017 साल तुम्हाला चांगले आठवत असेल. नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे बनावट दारू निर्मितीमुळे 14 जाणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, 16 जण कायमचे आधू झाले होते. ही दारु चक्क जिल्हा रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये तयार करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपाधिक्षक आनंद भोईटे यांनी या दारुकांडाचा पर्दाफाश केला होता. ही पुनरावृत्ती त्यानंतर दोन ठिकाणी पहायला मिळाली. आज तीन वर्षानंतर देश संकटात असतांना संगमनेर सारख्या ठिकाणी पहायला मिळू शकते की काय.! असे भितीचे वातावरण अनेकांच्या मनात उभे राहू लागले आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बनावट दारु निर्मितीचे प्रकार उघड होताना दिसू लागले आहे.
                   देश बंद असतांना दारूची दुकाने उघडी कशी असू शकतात, लोक पुरवठा करतात तरी कसा, विक्री होते तरी कशी, असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो आहे. मात्र, शहरातील काही बार व सरकारमान्य दुकानांची पुढील दरवाचे उघडे जरी असले तरी मागिल दरवाजाने सर्व काही अलबेले सुरू आहे. यासाठी स्कुटीसारख्या वाहनांचा वापर केला जात असून देशी व बनावट दारु यांची मिश्रण करुन शेतात माला एवजी दारुच्या हातभट्ट्या सुरू असल्याचे चित्र दिसत असून स्थानिक नागरिक माध्यमांना फोटो शेअर करुन तक्रारी करत आहेत. अर्थात पोलिसांनी या परिस्थितीत कोठे कोठे लक्ष द्यायचे? पण, राज्य उत्पादन शुल्क कोणत्या लढाईवर गेले आहे. हे समजेनासे झाले आहे. दारु ही इतकी जिवनावश्यक वस्तू झाली आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळतच नाही.
हा देश कोठून कोठे चालला आहे हे काहीच कळायला तयार नाही. देशात ज्या सरासरीत कोराना अजाराने लोक मरत आहेत. त्याच्या 30 टक्के तुलनेत लोक दारू न मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचे पीटीआयच्या अहवालातून उघड झाले आहे. सद्या ही संख्या 10 असून ती वाढती आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोक भाजीपाला नको पण दारुची एक कॉर्टर आणून द्या अशा निर्लज्ज पणाच्या मागण्या करीत आहेत. 
                    अर्थात हा बनावट दारुचा विपर्यास तत्काळ थांबला पाहिजे. अन्यथा तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नाही हे प्रशासनेचे यश असून त्यांचे कौतुक होते. मात्र, बनावट दारूला आळा घालण्यासाठी तुम्ही पांगरमल सारख्या दारुकांडाची वाट पाहु नये. हीच प्रशासनाला कळकळीची विनंती संगमनेरकरांनी केली आहे.

तर जिल्ह्यात इराण व पांगरमलची पुनरावृत्ती.
      दरम्यान एक गोष्ट लक्षात येते की, संमगनेर हा चार मोठ्या शहरांना लागून आहे. नगर, नाशिक, पुणे व मुंबई अशा ठिकाणांहुन ट्रान्सपोर्ट गाड्यांच्या माध्यमातून मिथेनॉल या विषारी द्रव्याची वाहतूक करणे अगदी सोपे आहे. अर्थात तुम्हाला ऐकण्यासाठी थोडे जड वाटेल पण पैशासाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशा लोकांची संख्या या शहरात कमी नाही. त्यामुळे बनावट दारुची विक्री करून काही लोक पैसा कमविण्याच्या नादी लागले आहेत प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेतले पाहिजे. कारण, मिथेनॉल वापरण्याची परवानगी फक्त एमआयडीसी भागात असून त्यावर कारवाई करण्याचा अधिकार फक्त केंद्र शासनला आहे. असे झाले नाही तर जिल्ह्यात पुन्हा इराण व पांगरमलची पुनरावृत्ती पहायला मिळेल.
सागर शिंदे
संपादक
दै.रोखठोक सार्वभौम
===========



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)