प्रेम प्रकरणातून काळजात चाकू भोकसला, हाफ मर्डर, दोघे गंभीर जखमी, तिघांवर गुन्हा दाखल.! रात्री रक्तपात, सकाळी प्रचार सभा.!


सार्वभौम (अकोले) :- 

अकोले शहरातील बाजारतळावर फिल्मी स्टाईलने चाकूने भोकसा-भोकसी झाल्याची घटना काल दि. २५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असून एका मुलीने आत्महत्या केली आणि त्याचे वैमनस्य म्हणून हा भयानक प्रकार घडला आहे. यात प्रदिप सुरेश वाघीरे (रा. शाहुनगर, ता. अकोले) व गणेश माने (रा. कल्याण) ही दोघे जखमी झाले आहेत. यात वाघीरे यांच्या छातीवर माने या तरुणाने वार केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी विजय बबन चव्हाण, गणेश विजय चव्हाण व गणेश माने अशा तिघांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आकाश सुरेश वाघीरे (रा. शाहुनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी. की, आरोपी यांच्या नात्यातील एका मुलीसोबत राहित वाघीरे याचे प्रेम संंबंध होते. त्यामुळेच संबंधित मुलीने आत्महत्या केली असे चव्हाण कुटुंबियांचे म्हणणे होते. त्यामुळे, ते वारंवार वाघीरे यांच्या घरी जात असे, तुमच्या मुळेच आमच्या मुलीने आत्महत्या केली त्यामुळे तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत शिविगाळ, दमदाटी करुन तुमच्याकडे पाहुन घेऊ अशी धमकी देत होते. मात्र, वाघीरे कुटुंबियांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, चव्हाण कुटुंब एकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आज ना उद्या यांच्या डोक्यातून राग निघुन जाईल असे यांना वाटत होते. मात्र, त्याचा काल उद्रेख झाल्याचे पहायला मिळाले.

दि. २५ एप्रिल २०२४ रोजी प्रदिप वाघीरे याने अकोले बाजारतळ येथे मसाल्याचे दुकान लावले होते तर दुसरा भाऊ संदिप याने काजु बदामाचे दुकान लावले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बाजार संपला असता हे दोघे दुकान आवरत होते. त्याच दरम्यान दुकान आवरु लागण्यासाठी अकाश देखील गेला होता. त्याच वेळी तेथे आरोपी विजय चव्हाण, गणेश चव्हाण व गणेश माने हे दुचाकीवर तेथे आले. तेव्हा हे प्रदिप यास म्हणाले. की, आमची मुलगी तुमच्या रोहित सोबत प्रेम संबंध असल्यामुळेच मयत झाली आहे. त्यामुळे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकएकाला संपून टाकतो असे म्हणून त्यांनी शिविगाळ दमदाटी सुरु केली.

दरम्यान यांच्यात काही चर्चा सुरू असताना मुख्य आरोपी गणेश माने याने त्याच्या हातातील चाकू प्रदिप वाघीरे यांच्या छातीत मारला. तो वार इतका भयानक होता. की, काही क्षणात तो जमिनीवर कोसळला. बाजार तळावर रक्ताचे थारोळे झाले. यावेळी विजय चव्हाण व गणेश चव्हाण यांनी देखील सोबत लाकडी दांडे आणले होते. त्यांनी आकाश व संदिप या दोघांना मारहाण केली. मात्र, प्रदिप यास जास्त लागल्यामुळे तेथे एकच आरडाओरड झाली, त्यामुळे, आरोपींनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला. मात्र, या झटापटीत गणेश माने याला देखील चांगलीच जखम झाली होती. त्यामुळे, त्याला उपचार घेणे गरजेचे होते. त्यामुळे, तो ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होता.

दरम्यान, प्रदिप हा पुर्णत: रक्ताने न्हाऊन निघाला होता. त्यामुळे त्यास राजेंद्र नाईकवाडी आणि अन्य काही समाजसेवकांनी डॉक्टर भांडकोळी यांच्याकडे ऍडमिट केले. मात्र, अंतर्गत रक्तस्त्राव फार झालेला होता. त्यामुळे, प्रदिपची प्रकृती चिंताजनक होती. त्याची रक्ताची नाडी देखील हाताला लागत नव्हती. मात्र, डॉ. भांडकोळी यांनी प्रथमोपचार केले आणि तत्काळ पुढील उपचारासाठी संगमनेर येथे पाठविले. सुदैवाने काही तास उलटून देखील प्रदिप मृत्युशी झुंज देत आहे. सदर घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन  कायदेशीर प्रक्रिया सुुरू केली. तर, याप्रकरणी आकाश वाघीरे यांच्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एकास अटक करण्यात आली असून दोघे पसार आहेत. विशेष म्हणजे रात्री ज्या ठिकाणी रक्तरंजीत घटना घडली आज त्याच ठिकाणी प्रचार सभा आहे. तेथे पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.